* न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण
* महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर माने यांचा अभिष्टचिंतन सोहळा
* खालापूर तालुक्यातील मान्यवरांचा पुरस्कार देवून सत्कार
खालापूर / मानसी कांबळे :- साप्ताहीक खालापूर वार्ताचा 5 वा वर्धापन दिन सोहळा, संपादक तथा न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने यांचा 55 वा वाढदिवस तसेच न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान सोहळा खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बौध्द पौर्णिमेदिवशी वावोशी फाटा येथील हरीओम मंगल कार्यालयात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक खोनपचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मधुकर किसन दळवी होते.
यावेळी व्यासपिठावर न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, शिवसेना रायगड जिल्हा महिला प्रमुख सुप्रिया साळुंखे, शिवसेना खालापूर तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय संघटक तथा उपक्रम प्रमुख डॉं. शेखर जांभळे, आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष गयासुद्दीन खान, जेष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ, शिवाजी जाधव, मुख्याध्यापक मारुती दासरे, बहुजन संकल्पचे संपादक तय्यब खान, महाराष्ट्राची भूमीचे संपादक डॉं. रविंद्र विष्णू जाधव, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन ठाणे जिल्हा संयोजक श्रीकांत म्हात्रे, रोहा तालुकाध्यक्ष याकुब सय्यद, पोलिस पाटील मनोज पारठे आदी उपस्थित होते.
दिपप्रज्वलन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले तसेच तसेच बौध्द पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर तथागत भगवान गौतम बुध्द यांना नतमस्तक होत विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. तद्नंतर हभप शिवाजी बुवा सुगदरे व मंडळी यांनी महाराष्ट्र गीत सादर करीत कार्यक्रमाची रौनक वाढवली. उपस्थित मान्यवरांचा साप्ताहीक खालापूर वार्ता ग्रुपकडून शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
साप्ताहिक खालापूर वार्ताचे मुख्य संपादक सुधीर माने यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे तसेच उपस्थित मान्यवर यांनी मुख्य संपादक सुधीर माने यांना दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्याकडून अशीच समाज सेवा अविरत घडत राहो, अशी प्रार्थना केली.
* न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन नियुक्ती पत्र प्रदान :-
या कार्यक्रमात न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. डॉं. शेखर जांभळे राष्ट्रीय संघटक तथा उपक्रम प्रमुख, मानसी कांबळे राष्ट्रीय महासचिव, ईशिका शेलार महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष, श्रीकांत म्हात्रे ठाणे जिल्हा संयोजक, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष जतीन मोरे, कर्जत-खालापूर विधानसभा अध्यक्ष संतोष मोरे, खालापूर तालुका अध्यक्ष सुधीर देशमुख, रोहा तालुका अध्यक्ष याकुब सय्यद आदींना नियुक्ती पत्र देण्यात आले.
* मान्यवरांचा पुरस्कार देवून सत्कार :-
खालापूर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा यावेळी समाज भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यात वावर्ले वस्ती शाळेचे शिक्षक भिकू नामदेव पाटेकर यांना आदर्श शिक्षक तर आदर्श शिक्षिका म्हणून पल्लवी प्रकाश चौलकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आला. ग्रुप ग्रामपंचायत हाळ खुर्द येथील ग्रामसेवक सुरज मुकादम यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. युवा किर्तनकार हभप दिलीप मारुती राणे यांना युवा कीर्तनकार, संतोष जानू पारठे यांना आदर्श पालक, ग्रामपंचायत वावोशी येथील विद्यमान सरपंच अश्विनी उदय उर्फ राजू शहासने यांना आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले. नडोदे गावचे सुपुत्र माजी सैनिक तुषार येरूणकर, मुस्कान खालिद सय्यद, तब्बसुम शरीफ खान, गोरठण बुद्रुक ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच एडवोकेट रमेश जनार्दन पाटील, खोपोलीच्या माजी आरोग्य सभापती प्रमिला सुर्वे, आंगणवाडी सेविका लता भाऊ शिगवण तसेच साप्ताहिक बहुजन संकल्पचे संपादक तय्यब खान व आकाश जाधव यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
* मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत :-
खोपोली नगरीचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील पाटील यांनी शुभेच्छा देत पत्रकारांच्या समस्यांबाबत ऊहापोह केला. तसेच त्यांनी सांगितले की, स्थानिक वृत्तपत्र टिकण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे. माजी आरोग्य सभापती मधुकर दळवी, शिवसेना रायगड जिल्हा महिला प्रमुख सुप्रिया साळुंखे, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय संघटक डॉं. शेखर जांभळे, शिवसेना खालापूर तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे, जेष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ, साप्ताहीक महाराष्ट्राची भूमीचे संपादक डॉं. रविंद्र जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, शेवटी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मानसी कांबळे व फिरोज पिंजारी यांनी केले तर आभार सुधीर देशमुख यांनी मानले.
Post a Comment
0 Comments